Wednesday 22 April 2015

चहा

चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असता ...
अवती भोवती पाहता पाहता हळूच चहाचा घोट घेताना तुमच्या लक्षात येते..
अरेच्या!!
साखरच घालायला विसरलो की काय....
पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती, कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर...
आयुष्य असच असतं...
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात, त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे....
एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे....
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे....
मान - अपमान मैत्रीत काहीच नसतं....
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहीजे.
जगाच्या या रंगमंचावर असे वावरा, की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.
जगातील सर्वात महाग पाणी कोणते, तर अश्रू ... कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९ टक्के भावना असतात.
त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका..
हसा आणि हसवत रहा…!!


--
पु. ल. देशपांडे

No comments:

Post a Comment