Saturday 16 April 2016

सखाराम गटणे

गटण्याचा हा 'व्यासंग' पाहून मी थक्क झालो. शब्द तर डबक्यावर शेवाळ माजावे तसे माजले होते. नेत्रदीपक काय, आल्हाद काय, मनाची प्रगाढ खोली काय--छे! पोट साफ करायच्या औषधासारखे तोंडातले हे शब्द साफ करणारे एखादे ओषध का नाही निघत, ह्या विचारात मी पडलो. शेवटी काही तरी बोलायचे म्हणून मी म्हटले, "वा! खूप बारकाईअनं अभ्यास चालवला आहेस--"
.

"माझ्या जिवनातल्या वाडःयीन कालखंडातलं शेवटलं प्रकरण आहे."
.

"म्हणजे?" हा मुलगा आता जीवजीव देणार आहे की काय अशी मला भीती वाटली, कारण असली पुस्तके खाऊन जगणारी मुले भलत्याच कुठल्यातरी श्रीमंताच्या नुसत्याच गो-या म्हणून सुंदर मानल्या गेलेल्या पोरींच्या प्रेमात पडतात आणि जीव तरी देतात किंवा डरपोक असली तर 'ऍंग्री यंग मेन' म्हणून चित्रविचीत्र पोशाख करून हिंडतात आणि दुस-याच्या खर्चाने कॉफीहाऊसमध्ये कॉफी पीत भयाण दिसणा-या, रोडक्या, माफक मिशीवाल्या पोरींबरोबर घाणेरड्या चित्रांतली आणि कवितांतली कला शोधत बसतात. पण गटण्या त्यांपैकी कशातच बसण्यासारखा नव्हता. नुसता फटाका फुटल्याचा आवाज सांगण्याचा प्रयास करीत होता, पण त्याला पुन्हा एकदा रडू फुटत होते. एकूण चमत्कारिकच प्रसंग होता.
.

शेवटी गटण्याने आपले रडू आवरीत बोलायला सूरूवात केली.
.

"मला क्षमा करा. यापुढं मी अपल्याला कसलीच तसदी देणार नाही."
.

"म्हणजे?" मी आपल्या मित्रमंदळीत ह्या गटण्याची कधी तरी चेष्टा केली होती. ती ह्याच्या कानावर गेली की काय? पण ते शक्य नव्हते. आमचे मित्र आणि गटणे यांचा सबधंच येणे सभंवत नव्हते. एक पोलीस प्रॉसिक्युटर, एक मोटारीचे स्पेअर पार्ट विकणारा, कोणी फायर इन्शुरन्स एजंत, तर कुणी मिलीटरीतला कप्तान असल्या माझ्या कथाकाव्याच्या वाटेलादेखील चुकून न जाणा-या निरोगी मित्रांत मीच फक्त लेखनकामासाठी करणारा होतो. ते जगत होते आणि मी लिहीत होतो. आमच्या मित्रांच्या वासाने गटण्याला घेरी आली असती. मी गटण्याची समजूत काढायची म्हणून म्हटले, "अरे तसदी कसली?"
.

"तसं नाही. तुम्ही फार केलंत माझ्यासाठी. वटवृक्षाच्या शितल छायेत अनेक पांथस्थ येतात त्याची वटवृक्षाला काय कल्पना?"
.

गटण्य़ाच्या ह्या वाक्याने गटणे 'नॉर्मल'वर आला हे मी ओळखले. मला वटवृक्षाची दिलेली उपमा पाहून उगीचच माझ्या नाकाखाली एक पांरबी लोंबायला लागली आहे असे मला वाटले आणी हसू आले.
.

"आपण माझ्या ह्या मुग्ध वाक्याला हसणं साहजिकच आहे. पण आपल्या मायेच्या शीतल छायेत बसणं माझ्या नशिबात नाही. जीवनात--"
.
"अरे पण--" मला ह्या 'जीवन' वगैरे शब्दांची भयंकर धास्ती वाटते. जगण्याला 'जीवन' म्हणावे अशी माणसे हजार वर्षातून एकदा जन्माला येतात. गटण्याने स्वतःच्या जगण्याला 'जीवन' म्हणणे म्हणजे सशाने स्वतःच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यापैकी होते. त्याचे ते जीवनापासून सूरू होणारे वाक्य मध्येच तोडून मी म्ह्टले, "अरे पण गटणे, झालं काय असं?"
.

"माझ्या जीवनात आता एक नवं पर्व सुरू होतंय!"
.

मुलगा अगदीच हाताबाहेर गेला होता. साइनबोर्ड पेंटरचा हा मुलगा स्वतः जणू काही महाभारताचा नायक असल्यासारखा पर्वविर्व म्हणायला लागला होता.
.
"कसलं पर्व?"
.
"कसं सांगू?" आपले भित्रे डोळे पायच्या आंगठ्याला लावून गटणे म्हणाला.
.
मग माझी खात्री झाली की, बापाच्या नावाचा बोर्ड रंगवून घ्यायला आलेल्या कुठल्या तरी मोटारीतून उतरणा-या गो-या तरूणीने गटाण्याचा खातमा केला. आजवर वाचलेल्या सर्व कादंब-यांचा कथानकांचे तात्पर्य ह्याच्या बापाच्या ध्यानी आले असणार आणि सखाराम गटणे तिथेच समात्प झाला असणार! शेवटी मीच होऊन त्याला विचारले,
.
"कुठे प्रेमाविमात पडलास की काय?"
.
"नाही!" विजापूरच्या चिमुकल्या शिवाजीने छाती काढून बादशहाला सांगावे तशी आपली अठ्ठावीस इंची छाती काढुन तो म्हणाला, "आजच्या जगात विशुद्ध प्रेम कुठंच मिळत नाही."
.
"कुणी सांगितलं तुला?"
.
"आपल्याच 'पाखरांची शाळा' नाटकातल्या नायकांच्या वाक्य आहे हे!"
.
मी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. 'पाखरांच्या शाळे' तले एक विनोदी पात्र हे वाक्य म्हणते. शेवटी मलाही हा प्रकार असह्य झाला आणि मी म्हटले,

"मग झालं काय तुला? एवढा तरुण तू, इतका व्यासंगी--माझ्यापेक्षादेखील तुंझ वाचन दांडगं--आणि रडतोस?"
.
"काय करू? परिस्थिती हा अश्रूंचा सर्वात मोठा कारखाना आहे असं वाळिंबे म्हणत असत."
.
"कोण वाळिंबे?"
.
"आमच्या प्राज्ञेचे सर!"
.
तो कोण वाळिंबे भेटला असता तर जुन्या सुलतानासारखा मी त्याला उलटा टांगून पुस्तके जाळून त्याची धूरी दिली असती.
.
"असली काय परीस्थीती आली तुझ्यावर?"
.
"माझ्या वडिलांना माझ्या जीवनाचं ध्येय कळत नाही."
.
माझ्या डोळ्यांपुढे सखाराम गटण्याचा पेंटर बाप आला. मी त्याला काळा की गोरा ते पाहिले नव्हते. बाकी पेंटर असल्यामुळे काळागोराच काय, तो अनेकरंगी असेल. त्या, अक्ष्ररे इंचावर मोजून रंग भरणा-या इसमाला त्याच्या घरात जन्माला आलेल्या ह्या बालबृहस्पतीचे जीवनध्येय काय कळणार? 'जीवनध्येय' म्हटल्यावर "कुठल्या साइजमध्ये लिहू साहेब?" म्हणणारा इसम तो!
.
"काय जीवनध्येय कळंल नाही त्यानां?"
.
"त्यांनी माझं लग्न करायचं कुटील कारस्थान रचलंय!" गटण्याचे लहानसे जांभळट ओठ थरथरत होते.
.
"अरे, मग कुटील कारस्थान कसंल त्यात? तुला लग्न करायचं नसल तर नाही म्हणून सांग!"
.
"तिच विनंती करायला मी आलो होतो. मला माझं काही वाटत नाही जीवनाच्या समरात..."
.
पुन्हा 'जीवन'! गटणे आता बाधं फोडून बोलत होता.
.
"...जीवनाच्या समरात रक्तबंबाळ व्हायचे प्रसंग यायचेच."
.
"अरे, चांगलं लग्न ठरवताहेत वडील तर रक्तबंबाळ कसाला होतोस?"
.
"मला माझं काही वाटत नाही. मी वडिलांच्या आज्ञेनुसार विवाहबंधनात स्वतःला जखडून घेईनही! प्रभू रामचंद्र हा माझा आदर्श आहे! मीही वडिलांची अनुज्ञा पाळीन."
.
प्रभू रामचंद्राने लग्न झाल्यावर अनुज्ञा पाळली होती हा तपशील गटणे विसरला. त्या एवढ्याशा देहातून प्रभू रामचंद्र वगैरे शब्द ऎकताना मला हसू आवरेना.
.
"बरं मग तुझं काय म्हणणं? मी तुझ्या वडलांना येऊन भेटू?"
.
"हे मी आपल्यावर सोपवतो. मी लग्नाला तयार आहे."
.
आता मात्र मला कळेना की हा वीर जर मान उतरवून द्यायला तयार आहे तर मी जाऊन काय शत्रूच्या तलवारीला धार काढून देऊ?

No comments:

Post a Comment